निवडणूक
विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका-…या नेत्याचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ज्यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय इतिहासात कोपरगाव शहराचे प्रश्न सोडवले नाही ते आज विकासाचे स्वप्न दाखवित असून त्यांच्या या भूलथापांना मतदारांनी मुळीच बळी पडू नये.आम्ही सहा वर्षात काय विकास केला आहे तो जनतेने पाहिला असल्याचे मतदारांनी आगामी संपन्न होणाऱ्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका प्रचार सभेत बोलताना केले आहे.

“राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे कोपरगावच्या विकासासाठी सक्षम उमेदवार आहेत.त्यामुळे विकास कामांना विरोध करणाऱ्या विरोधकांनी निवडणूक पण कोर्टात नेऊनही त्यांच्या पदरी अपयश पडले आहे.कोयटे यांचेवर बिनबुडाचे आरोप आणि निराधार टीका करून पाहिली मात्र जनसामान्यांच्या सुख-दु:खात आणि अडीअडचणीत धावून जाणाऱ्या व्यक्तीबद्दल होणारी टीका कोपरगावकरांना रुचली नाही.पतसंस्थेच्या बाबतीत तीच अनुभूती आली असल्याने ते निराश झाले आहे”-आ.आशुतोष काळे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे.त्यांनी सन-2019 साली विधानसभेत निवडून आल्यावर शहराला पाच क्रमांकाचा तलाव पूर्ण करून दिला आहे.गेली दोन दिवस प्रचार सभा,फेऱ्यांना ऊत आला आहे.विकासकामांची स्वप्न खैरात होत आहे.त्यातच राष्ट्रवादीने त्यामुळे एकवीस दिवसांनी मिळणारे पाणी आता चार दिवसाआड आणले असल्याचा दावा केला आहे.शहरातील रस्त्यांना मोठा निधी आणून दिला आहे.त्यामुळे आगामी मतदानाचे दिवशी मतदारांनी जागृत राहणे गरजेचे असून त्याबाबत त्यांनी प्रभाग क्रमांक ०७ व १५ मधील कॉर्नर सभेत नागरीकांशी आ.आशुतोष काळे यांनी संवाद साधला याप्रसंगी ते बोलत होते.

“आपल्या विरोधात त्यांनी अनेक डाव टाकले परंतु त्यांचे सगळे डाव त्यांच्यावर उलटले आहे.समता पतसंस्थेची आणि वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु जनता आपल्या सोबत असल्याने हा डाव पण त्यांच्यावरच उलटला.कोपरगावच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम आहे.त्यामुळे आपला विजय निश्चित असून नगराध्यक्ष म्हणून लवकरच तुमच्या सेवेत हजर होणार आहे”-ओमप्रकाश कोयटे,राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार.
सदर प्रसंगी नगराध्यक्ष उमेदवार ओमप्रकाश कोयटे,ज्येष्ठ नेते सतिष कृष्णांनी,शहर प्रमुख सुनील गंगूले,माजी गटनेते वीरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,माजी महिला नगरसेवीका प्रतिभा शिलेदार,सुनील शिलेदार आदीसह प्रभाग क्रमांक 07 व 15 मधील नगरसेवक पदाचे उमदेवार आदी मान्यवरसंह मोठ्या संख्येने नागरिक मतदार उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून विरोधकांच्या तोंडून विकासाच्या गप्पा कोपरगावकरांना ऐकायला मिळाल्या आणि त्यांनी नेहमीप्रमाणे विकासाचे स्वप्न दाखवत आहे जे आजपर्यंत कधीच त्यांनी पूर्ण केलेले नाही आणि यावेळी सुद्धा करणार नाही.कारण ४० वर्ष कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता त्यांच्या ताब्यात होती तरी त्यांना कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही व कोपरगाव शहराचा विकासही करता आला नाही.विकास करण्याच्या भूलथापा देवून त्यांनी नेहमीच कोपरगावकरांची दिशाभूल केली आहे आणि आताही करत आहेत.विरोधक आज विकासाबद्दल जे सांगतात तो त्यांना तो चाळीस वर्षात का करता आला नाही ? असा प्रश्न कोपरगावकरांना पडला आहे.त्यामुळे ज्यांना सत्ता असतांना विकास करता आला नाही ते आता काय विकास करणार ? त्यामुळे कोपरगावकरांसाठी हीच नामी संधी आहे.आपण दिलेला शब्द पूर्ण करतोच हे कोपरगावकरांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून आणि २०१९ पासून कोपरगाव शहराच्या झालेल्या विकासावरून पाहिले आहे.त्यामुळे कोपरगावकरांच्या मनातील विकास सत्यात उतरविण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरात मागील चाळीस वर्षापासून रखडलेली विकासाची कामे प्रगती पथावर आहे.पुढच्या तीन वर्षात शहराचे मुलभूत प्रश्न सोडवून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे माझे स्वप्न आहे.सहा वर्षांपासून कोपरगावचे अनेक दशकापासुंचे प्रलंबित प्रश्न सोडवत आहे.पुढच्या काळात कोपरगाव शहराला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. शहराचा विकास साधण्यासाठी पालिकेची सत्ता असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम आणि विकासाभिमुख प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे विकासाचे प्रतिनिधी असून,त्यांच्या माध्यमातून कोपरगावच्या प्रगतीचा वेग अधिक वाढणार आहे.त्यासाठी आपल्या विचाराचे प्रतिनिधी आणि कोयटेसारखा सारखा अनुभवी साथीदार नगरपालिकेत असणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्यांचे योगदान आहे. समता उद्योग मंदिराच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देत महिलांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करीत आहे.कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाची जाण असलेला,सामाजिक भान ठेवणारा व्यक्ती काकासाहेब कोयटे यांच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून शहराला मिळाला,तर कोपरगावचा चेहरा-मोहरा निश्चितच बदलणार आहे.कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून शहरात परिवर्तनाची लाट सुरू आली आहे वर्षानुवर्ष सत्ता असूनही विकास करू न शकणाऱ्या विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची ही संधी न गमावता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष व नगरसेवकांना बहुमताने विजयी करा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केले आहे.



