निवडणूक
शहराच्या विकासासाठी कोयटे सक्षम नेतृत्व-…या नेत्याचा दावा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ओमप्रकाश कोयटे हे सक्षम नेतृत्व असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कॉर्नर सभांना कोपरगावकरांचा मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता हि विजयाचे संकेत असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका प्रचार सभेत बोलताना केले आहे.

"आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावाला १३१ कोटी रुपयांचा निधी आणला मात्र हा निधी मिळवितांना १५ टक्के निधी जो शासनाला द्यावा लागणारा १५ टक्के निधी सुद्धा त्यांनी राज्य शासनाकडून माफ करून १०० टक्के निधी मंजूर करून आणला मात्र त्याची झळ कोपरगावकरांना बसू दिली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात आपली एकमेव नगरपालिका आपली आहे"-ओमप्रकाश कोटे,नगराध्यक्ष पदाचेउमदेवार,राष्ट्रवादी.अजित पवार गट.
कोपरगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मोठ्या उत्साहात आगामी २० डिसेंबर रोजी संपन्न होत असून त्यासाठी राष्ट्रवादीने मागील सन-२०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी जय्यद तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार नाही अशी स्थिती दिसून येत आहे.पहिल्या प्रचार टप्प्यात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित केले होते.त्यासभेला त्यांनी मोठी गर्दी जमवली होती.त्यानंतर मात्र दि.२९ नोव्हेंबर रोजी न्यायिक कारणाने निवडणूक पुढे ढकलली होती.त्यानंतर सर्वच पक्ष थोडे ढिल्या अंगाने निवडणूक घेतील असे वाटत असताना अपक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा मरगळ झटकून मुसंडी मारून कामाला गती दिली असल्याचे दिसून आले आहे.मात्र यात अपक्ष उमेदवारांची पुरती वाट लागली असल्याचे दिसून आले आहे.मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे.आज राष्ट्रवादी आ.काळे गटाने कोणतीही कसर राहायला नको ची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.यासाठी आज मतदारांना करमणूक करण्यासाठी,”चला हवा येऊ द्या”चा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे.त्यामुळे त्यास किती गर्दी होणार याकडे कोण आघाडी घेणार ? याकडे शहरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने कोपरगाव शहरातील प्र.क्र.०८व ०९ मध्ये आ.आशुतोष काळे यांनी कॉर्नर सभा घेवून नागरिकांशी संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे हे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत.समताच्या माध्यमातून त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्य शहराच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचलेले आहे.सामाजिक कार्य आणि समता संस्थेच्या माध्यमातून त्यांची ओळख कोपरगावकरांना आहे.त्याच्या सामाजिक कामाची व सर्वसामान्य जनतेप्रती असलेल्या जिव्हाळ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाची त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ओमप्रकाश कोयटे हे सक्षम नेतृत्व असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कॉर्नर सभांना कोपरगावकरांचा मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद पाहता हि विजयाची नांदी आहे. समता संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून अन्नप्रसाद सेवा चालवली जात आहे.यात गरजू,असहाय्य,वृद्ध,अपंग आणि गोरगरीब कुटुंबांना दररोज सकाळ-संध्याकाळ घरपोच जेवणाची सेवा दिली जाते.शिर्डी येथे अनाथ आश्रम,कोपरगावात समतेची भिंत असे अनेक सामाजिक उपक्रम कोयटे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरात अनेक वर्षांपासून सुरु आहे.त्यामुळे जो व्यक्ती राजकारणाव्यतिरिक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात सक्रीय आहे अशा व्यक्तीला निश्चितच समाजाप्रती आत्मीयता आहे.त्यामुळे त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असून कोपरगाव शहराचा नगराध्यक्ष म्हणून ओमप्रकाश कोयटे आपली जबाबदारी चोखपणे पार पडतील याचा आपल्याला आणि कोपरगावकरांना विश्वास असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे म्हणाले की,”आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावाला १३१ कोटी रुपयांचा निधी आणला मात्र हा निधी मिळवितांना १५ टक्के निधी जो शासनाला द्यावा लागणारा १५ टक्के निधी सुद्धा त्यांनी राज्य शासनाकडून माफ करून १०० टक्के निधी मंजूर करून आणला मात्र त्याची झळ कोपरगावकरांना बसू दिली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात आपली एकमेव नगरपालिका आपली आहे ज्या नगरपालिकेला १०० टक्के निधी राज्य शासनाचा मिळालेला आहे. यापुढेही असेच विकासाचे अनेक व्हिजन त्यांना आपल्या माध्यमातून राबवायचे आहे.कोपरगाव शहराच्या विकासाला निधी मिळविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच सहकार्य करतात व यापुढेही त्यांचे सहकार्य राहणार आहे.त्यामुळे कोपरगावच्या सर्वागीण विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या ज्याप्रमाणे चाळीस वर्षाचा पाणी प्रश्न शब्द दिल्याप्रमाणे सोडून दाखविला त्याप्रमाणे यापुढील चार वर्षात विकासाचे सर्वच प्रश्न आ.काळे यांच्या सहकार्याने सोडवून दाखवणार असल्याचे कोयटे यांनी शेवटी सांगितले आहे.



