निवडणूक
…या शहरात मतदार जनजागृती अभियान संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील स्थानिक कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नुकतीच मतदार जनजागृती अभियानांतर्गत मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली आहे.

मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून आपल्या लोकशाहीच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे.जेव्हा लोक मतदान करत नाहीत,तेव्हा ते प्रभावीपणे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत असतात.आणि जे मतदान करतात त्यांच्या हाती सहज सत्ता सोपवतात परिणामी सत्तेत येणारे घटक वाईट निर्णय घेऊ शकतात याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
मतदान महत्त्वाचे आहे कारण लोकांसाठी त्यांच्या सरकारमध्ये मत मांडण्याचा आणि त्यांच्या आवडीचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी निवडण्याचा हा एक मार्ग आहे.लोकांसाठी त्यांच्या सरकारला जबाबदार धरण्याचा हा एक मार्ग आहे.मतदानामुळे लोकांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयांमध्ये आवाज मिळू शकतो.
मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून आपल्या लोकशाहीच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे.जेव्हा लोक मतदान करत नाहीत,तेव्हा ते प्रभावीपणे स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेत असतात.आणि जे मतदान करतात त्यांच्या हाती सत्ता सोपवतात.यामुळे वाईट निर्णय घेतले जाऊ शकतात जे प्रत्येकावर परिणाम करत असतात.शेवटी,मतदान महत्त्वाचे आहे कारण ते आमच्या निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना संदेश देते की आमच्या देशात काय घडते याची आम्हाला काळजी आहे आणि आम्ही आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या समस्यांकडे लक्ष देत आहोत.जेव्हा मोठ्या संख्येने लोक मतदान करत नाहीत,तेव्हा ते संदेश पाठवते की आम्ही आत्मसंतुष्ट आहोत आणि ते काहीही करू शकतात.
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम विविध स्तरावर सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी कोपरगाव शहरात प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो !” अशा घोषणा देऊन जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीचे संदेश फलक हातात घेऊन प्रभात फेरीत घोषणाही दिल्या आहेत.
सदर प्रसंगी प्रभात फेरी महाविद्यालयातुन सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,छत्रपती संभाजी महाराज स्मारक यामार्गे निघून कोपरगाव तहसील कार्यालय येथे समाप्त झाली आहे.
सदर प्रसंगी तहसीलदार संदीपकुमार भोसले,गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रभात फेरीत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे.मतदार जनजागृती प्रभात फेरीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या प्रभात फेरीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.