जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडेच्या कालव्यांसाठी…इतक्या रुपयांची आर्थिक तरतूद जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचा जलसंपदा विभागाचा १५ हजार ०६६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला असून यात निळवंडे धरण आणि कालव्यांसाठी २६९.९९ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून या खेरीज नाबार्ड कडून १०० कोटी अशी सुमारे ३७० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र ती गतवर्षी पेक्षा ७० कोटी रुपये कमी आहे.मात्र या वर्षी मात्र केंद्र सरकार कडून बिनव्याजी रक्कम मिळण्याचा मार्गही मोकळा झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याला जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुखमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस आदींचे आभार मानले आहे.व हा प्रकल्प लवकर मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.

“गत वर्षी महाआघाडीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या विभागाला १३ हजार २५२ कोटींची तरतूद केली होती तर निळवंडेसाठी अडीच वर्षात १ हजार ०४७ कोटी रुपयांची विक्रमी तरतुद केली होती.त्या पार्श्वभूमीवर हि तरतूद केवळ ०१ हजार ६२६ कोटींनी कमी आहे.तर तेलंगणा पेक्षा मात्र खुपच कमी मानली जात आहे.तर निळवंडेसाठी गतवर्षी हीच आर्थिक तरतूद तब्बल ४४० कोटी रुपयापर्यंत होती मात्र ती यावर्षी ७० कोटींनी कमी आहे”रुपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती अ.नगर-नाशिक.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा उजव्या कालव्यासाठी ५२ वर्ष उलटली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून यावर्षीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ५ हजार १७७.३८ कोटींवर गेला असल्याने आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांच्या खंडपीठाने दि.१८ जानेवारी २०२३ रोजी अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.१३३/२०१६) नुकतेच बजावले होते.त्यामुळे आता वेळकाढूपणा न करता या विभागाला डावा कालवा मार्च २०२३ अखेर तर उजवा कालवा हा जून २०२३ अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले आहे.या पार्श्वभूमीवर काल राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आहे.त्यात हि तरतूद केली आहे.

गत वर्षी महाआघाडीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या विभागाला १३ हजार २५२ कोटींची तरतूद केली होती त्या या पार्श्वभूमीवर हि तरतूद केवळ ०१ हजार ६२६ कोटींनी कमी आहे.तर तेलंगणा पेक्षा मात्र खुपच कमी मानली जात आहे.तर निळवंडेसाठी ती गतवर्षी तब्बल ४४० कोटी रुपयापर्यंत होती मात्र ती यावर्षी ७० कोटींनी कमी असल्याची प्रतिक्रिया कालवा कृती समितीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार-गेल्या ८ महिन्यात निळवंडेसह २७ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली असून या चालू २६८ पैकी ३९ प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार असल्याची घोषणा केली आहे.तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील ६ प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार असल्याची माहिती दिली आहे.बळीराजा जलसंजीवनी योजनेतील २४ प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले आहे.तर विदर्भातील गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी १५०० कोटी,जून २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अभिवचन दिले आहे.

नदीजोड प्रकल्प राज्य सरकारने मनावर घेतले असून त्यात दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून नार-पार,अंबिका,औरंगा,दमणगंगा,वैतरणा,उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील पाणी वापरणार असल्याचे म्हटले आहे.मुंबई,गोदावरी खोर्यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार असल्याची घोषणा केली आहे.त्यातून मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नगर,जळगावला लाभ मिळणार आहे.याशिवाय वैनगंगा खोर्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर,वर्धा,अमरावती,यवतमाळ,अकोला,बुलढाणा,वाशिम आदी जिल्ह्यांना लाभ होणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज्याच्या जलसंपदा विभागाच्या या आर्थिक तरतुदीबद्दल निळवंडे लाभक्षेत्रातील निलवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेन्द्र काले,कार्याध्यक्ष-गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष-एस.यू.उऱ्हे सर,व संजय गुंजाळ,सचिव-कैलास गव्हाणे,संघटक-संदेश देशमुख,सुधाकर शिंदे,वामनराव शिंदे,संघटक नानासाहेब गाढवे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,दत्तात्रय चौधरी,विठ्लराव देशमुख,संतोष तारगे,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,सुधाकर शिंदे,विक्रम थोरात,राजेंद्र निर्मळ,भरत शेवाळे,कौसर सय्यद,दौलत दिघे,आप्पासाहेब कोल्हे,अड.योगेश खालकर,सचिन मोमले,महेश लहारे,रावसाहेब मासाळ,नवनाथ शिरोळे,सोमनाथ दरंदले,वाल्मिक नेहे,नामदेव दिघे,संतोष गाढवे,अशोक गांडूळे,शरद गोर्डे,शिवाजी जाधव,दत्तात्रय आहेर,शिवनाथ आहेर,गोरक्षनाथ शिंदे,दत्तात्रय थोरात,वसंत थोरात,रावसाहेब सु.थोरात,अशोक गाढे,ज्ञानदेव पा.हारदे,बाळासाहेब चि.रहाणे,बाळासाहेब सोनवणे,आबासाहेब सोनवणे,नरहरी पाचोरे,रामनाथ पाडेकर आदी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close