जलसंपदा विभाग
निळवंडेच्या धरणाच्या पंचम सुधारीत प्रशासकीय प्रस्तावास मंजुरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निळवंडे प्रकल्पाच्या ५१७७.३८ कोटी रुपये किंमतीच्या पंचम सुधारीत प्रशासकीय प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.याचे निळवंडे कालवा कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आदींचे अभिनंदन केले आहे.

पंचम प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रस्तावात पाईप चाऱ्यांसाठी व वितरण व्यवस्था आदींसाठी १ हजार कोटी ३५५ लाख १५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी १३४.२२ कोटी रुपये आणि डाव्या कालव्याच्या लाईनींगसाठी २४१.६१ कोटी रुपये अशी एकुण ३७५.८३ रुपयांची तरतूद करण्यात आली आहेपंचम प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रस्तावात पाईप चाऱ्यांसाठी व वितरण व्यवस्था आदींसाठी १ हजार कोटी ३५५ लाख १५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.-रुपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती, अ,नगर,नाशिक.
तसेच उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी १३४.२२ कोटी रुपये आणि डाव्या कालव्याच्या लाईनींगसाठी २४१.६१ कोटी रुपये अशी एकुण ३७५.८३ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा उजव्या कालव्यासाठी ५२ वर्ष उलटली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून ५ हजार १७७.३८ कोटींवर गेला असल्याने आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांच्या खंडपीठाने अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.१३३/२०१६) नुकतेच बजावले असल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी हादरले होते.त्यामुळे आता वेळकाढूपणा न करता या विभागाला डावा कालवा मार्च अखेर तर उजवा कालवा हा जून अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले असताना माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या प्रयत्नातून कालवा कृती समितीने
तत्कालिन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पंचम सुप्रमा व अस्तरीकरणाचे महत्त्व पटवून दिले होते.त्यास जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठे कष्ट घेतले होते.त्यास उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री दवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदलल्यावर तत्काळ होकार भरला होता.त्यांच्या या प्रकल्पाच्या पूर्वानुभवातून भाजप सरकारने या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतल्याने निळवंडे लाभक्षेत्रातील सर्व दुष्काळी गावातील कालवा कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यापुर्वीची सन २०१७ मधील चतुर्थ प्रशासकीय मान्यता रु.२३६९.९५ कोटी रुपये किंमतीची होती.सन १९७० मधील प्रथम प्रशासकीय मान्यता ९.९३ कोटी रुपयांची होती.
पंचम प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रस्तावात पाईप चाऱ्यांसाठी व वितरण व्यवस्था आदींसाठी १ हजार कोटी ३५५ लाख १५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी १३४.२२ कोटी रुपये आणि डाव्या कालव्याच्या लाईनींगसाठी २४१.६१ कोटी रुपये अशी एकुण ३७५.८३ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्याला जलसंपदा अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
डावा मुख्य कालवा व शाखा कालवे मार्च २०२३ अखेर तसेच उजवा मुख्य कालवा जुन २०२४ पर्यंत करण्यात येणार आहेत.
पाईपलाईन चाऱ्यांचे सर्वेक्षण जानेवारी २०२३ पासून चालू झाले आहे.पाईपलाईन चाऱ्यांचे काम २०२७ पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे.
या निर्णयाबद्दल दुष्काळी भागातील जलसंपदा चे माजी कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष-गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष-एस.यू.उऱ्हे सर,व संजय गुंजाळ,सचिव-कैलास गव्हाणे,संघटक-संदेश देशमुख,सुधाकर शिंदे,वामनराव शिंदे,संघटक नानासाहेब गाढवे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,दत्तात्रय चौधरी,विठ्लराव देशमुख,संतोष तारगे,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,सुधाकर शिंदे,विक्रम थोरात,राजेंद्र निर्मळ,भरत शेवाळे,कौसर सय्यद,दौलत दिघे,आप्पासाहेब कोल्हे,अड.योगेश खालकर,सचिन मोमले,महेश लहारे,रावसाहेब मासाळ,नवनाथ शिरोळे,सोमनाथ दरंदले,वाल्मिक नेहे,नामदेव दिघे,संतोष गाढवे,अशोक गांडूळे,शरद गोर्डे,शिवाजी जाधव,दत्तात्रय आहेर,शिवनाथ आहेर,गोरक्षनाथ शिंदे,दत्तात्रय थोरात,वसंत थोरात,रावसाहेब सु.थोरात,अशोक गाढे,ज्ञानदेव पा.हारदे,बाळासाहेब चि.रहाणे,बाळासाहेब सोनवणे,आबासाहेब सोनवणे,नरहरी पाचोरे,रामनाथ पाडेकर,दगडू रहाणे,भाऊसाहेब चव्हाण,वाल्मिक नेहे,अलिमभाई सय्यद,शब्बीरभाई सय्यद आदींनी समाधान व्यक्त केले आहे.