जलसंपदा विभाग
…या नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण,दारणा धरण,पालखेड धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत असून नांदूर मधमेश्वर उंचवणी बंधाऱ्यातून धरण परीचालन सुची नुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारा पाणी येवा बघता जलसंपदा विभाग गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन कोपरगाव चे तहसीलदार महेश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.

“नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण,दारणा धरण,पालखेड धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत असून गोदावरी नदीत पाणी सोडले जात असून त्यामुळे पाणी पूर वाढू शकतो त्यामुळे गोदावरी नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी”-तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव.
मागील काही दिवसांमध्ये दडी मारून बसलेला पाऊस नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा परतला असून,गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.दोन दिवसांत शहरात ४३.५,तर जिल्ह्यात ६८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.तसेच हवामान विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह ५० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला होता तो आता खरा ठरत आहे.यंदा मान्सून जोरदार बरसणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात आता मान्सूनचे आगमन झाले असून,आता बरसत असलेला पाऊस हा मान्सूनचा आहे.त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण,दारणा धरण,पालखेड धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत असून गोदावरी नदीत पाणी सोडले जात असून त्यामुळे पाणी पूर वाढू शकत असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील एकूण येवा बघता जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीमध्ये विसर्ग १२ हजार क्यूसेक्स प्रवाहित करण्यात आलेला आहे.आगामी काळात धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार असल्याची माहिती आहे.परिणामी गोदावरी नदीकाठच्या नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की,नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन,चीजवस्तु,शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.संबंधित शासकीय यंत्रणांनी,ग्रामस्तरीय यंत्रना व अधिकारी यांनी याबाबत गावकऱ्यांना दवंडी देवून दक्षता घेणेस कळवावे असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी शेवटी केले आहे.