आंदोलन
महसुल अधिकारी,कर्मचाऱ्यांची मुजोरी बंद करा-…या नेत्यांची तंबी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महसूल विभागाने सुरु केलेल्या काम बंद आंदोलनामुळे नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरु असलेली मुजोरी चालणार नाही नागरीकांना वेठीस न धरता महसूल विभागाचे काम त्वरित सुरु करा अशा सुचना ‘न्यूजसेवा’च्या वेबसाईट वृतावरून आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या असल्याची बातमी हाती आली आहे.

या संबंधी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तहसील कार्यालयाचे त हसिलदार महेश सावंत यांचेशी भ्रमणध्वनीवरून या आंदोलनप्रश्नी संपर्क साधला असता त्यानी अद्याप संप मिटला नसून लवकरच मिटेल असे सूतोवाच केले आहे.वरिष्ठ अधिकारी कोणी आंदोलन कर्त्याना भेटले का ? याबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी यांना तलाठी संघटनेचे पदाधिकारी नगर येथे भेटले असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरीतीरी असलेल्या धारणगाव येथील तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड आणि त्यांचा सहकारी सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी लाच घेताना पकडले असताना लाच लुचपत विभागाने सदर गुन्हा हा सदोष दाखल केला असल्याचा आरोप करत आज तालुका तलाठी संघटनेने काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज सात दिवस उलटूनही त्यावर कोणताच तोडगा दृष्टिपथात न आल्याने सदर आंदोलनामुळे तालुक्यातील नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत असल्याची बातमी काल प्रसिद्ध केली होती.त्यामुळे या प्रश्नावर आ.आशुतोष काळे यांनी लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली होती त्यावर त्यांचे प्रसिध्दी कार्यालयाने आज हे प्रसिध्दी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की,”कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका तलाठी संघटनेने मागील आठ दिवसापासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.त्यामुळे नागरीकांना होत असेलल्या त्रासाची दखल घेवून आ.काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना यावर तातडीने तोडगा काढून काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शेतकरी,विद्यार्थी व नागरिकांचे महसूल विभागाशी सबंधित कामे अडली आहेत.१० वी १२ वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते.प्रवेशाच्या वेळी वेळेत दाखले उपलब्ध होत नसल्यामुळे १० वी १२ वीचे विद्यार्थी परीक्षा आटोपताच विविध शासकीय दाखले काढून ठेवतात त्यामुळे पुढच्या अडचणी कमी होवून विद्यार्थी व पालकांची धावपळ होत नाही.परंतु तलाठ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळविण्यात अडचणी येत आहेत.तसेच नागरीकांना विविध कामांसाठी उत्पनाचे दाखले तसेच शेतीवर घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी शेतीचे चालू वर्षाचे उतारे आवश्यक असतात.सर्वच बँकांची वर्षअखेरीचा ताळेबंद जुळविण्याची प्रक्रिया वेगात सुरु असून कर्जधारक शेतकऱ्यांकडे कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांचा तगादा सुरु आहे परंतु तलाठ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांना शेतीचे सात बारा उतारे मिळत नाही अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.
त्या पार्श्वभूमीवर नागरीकांना महसूल विभागाच्या काम बंद आंदोलनामुळे येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरु असलेली मुजोरी यापुढे खपवून घेणार नाही.त्याबाबत तुम्ही केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून त्यांच्याकडून मार्गदर्शक सूचना घ्या व त्या सूचनेनुसार काम करा.सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेवून महसूल विभागाचे काम त्वरित सुरु करा अशा सुचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना शेवटी दिल्या आहेत.आता महसूल अधिकारी आणि कर्मचारी काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान या संबंधी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तहसील कार्यालयाचे त हसिलदार महेश सावंत यांचेशी भ्रमणध्वनीवरून या आंदोलनप्रश्नी संपर्क साधला असता त्यानी अद्याप संप मिटला नसून लवकरच मिटेल असे सूतोवाच केले आहे.वरिष्ठ अधिकारी कोणी आंदोलन कर्त्याना भेटले का ? याबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी यांना तलाठी संघटनेचे पदाधिकारी नगर येथे भेटले असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.त्यामुळे आ.काळे यांनी घेतलेली दखल कामी येईल असे चित्र दिसत आहे.