आंदोलन
…या नेत्याची मराठा समाज साखळी उपोषणाला भेट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा बांधवांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांची आ.आशुतोष काळे यांनी भेट घेवून पाठिंबा दिला आहे.मात्र मनोज जरांगे यांनी गावोगाव मराठा नेत्यांना गावबंदीचे फर्मान काढले असताना या ठिकाणी उलट स्थिती पाहायला मिळाली आहे.त्यामुळे तालुक्यात या आंदोलनाबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाली आहे.

मनोज जरांगे यांना चाळीस दिवसांची मुदत संपल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.त्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुक्यात पाठिंबा मिळत आहे.मात्र या ठिकाणी विरोधाभास दिसून येत आहे.त्यामुळे हे पाठिंब्याचे आंदोलन इतर आंदोलनापेक्षा वेगळे कसे असा सवाल निर्माण झाला आहे.
मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांत आरक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्रात मराठा समाजातर्फे केली जात होती.यासाठी मराठा समाजातील लोकांनी आंदोलने केलीत.मनोज जरांगे यांना चाळीस दिवसांची मुदत संपत आल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.त्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुक्यात पाठिंबा मिळत आहे.मात्र या ठिकाणी विरोधाभास दिसून येत आहे.त्यामुळे हे पाठिंब्याचे आंदोलन इतर आंदोलनापेक्षा वेगळे कसे असा सवाल निर्माण झाला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण दि.२५ऑक्टोबर पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र आंदोलन न करता जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.त्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण केले जात आहे.कोपरगाव शहरात मराठा समाजाच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाला आ.काळे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
सदर प्रसंगी उपोषणकर्ते अनिल गायकवाड,विनय भगत,अमित आढाव,बाळासाहेब जाधव,माजी नगरसेवक कृष्णा आढाव,राजेंद्र वाकचौरे,सुनील शिलेदार,निखील डांगे,चंद्रशेखर म्हस्के,बाळासाहेब रुईकर,मुकुंद इंगळे,शैलेश साबळे,सचिन गवारे,राजेंद्र आभाळे,रविंद्र राऊत,मनोज नरोडे,बाळासाहेब शिंदे,बबलु वाणी,माजी नगरसेवक मंदार पहाडे,आकाश डागा,राजेंद्र जोशी,महेश उदावंत,दिनेश संत आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.