जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

‘मराठा आरक्षण’ऐरणीवर,कोपरगावात वाढता पाठींबा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यातील अंतरवली जालना घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या घटनेनंतर पुन्हा एकदा या मुद्यावरून रान पेटले जात असताना दिसत असून कोपरगावात मराठा समाजाच्या वतीने अड्.योगेश खालकर,अनिल गायकवाड,विजय भगत आदीं कार्यकर्त्यानी,’आमरण उपोषण’ सुरु केले असून त्याचा आज दुसरा दिवस असताना त्या आंदोलनाला वाढता पाठींबा दिसत असल्याने कोपरगाव तालुक्यातील सत्तासमर्थक नेत्यांची पंचायत होण्याची शक्यता वाढली आहे.

“केंद्राने भारतीय राज्य घटनेची दुरुस्ती करून सूची ९ मध्ये आरक्षण टाकून तामिळनाडू राज्याप्रमाणे आरक्षण मर्यादा ६९ टक्क्यांपर्यंत वाढवावी व राज्यातील मराठा समाजाला दिली जाणारी सापत्नपणाची वागणूक तात्काळ थांबवावी”-अड्.योगेश खालकर,विधीज्ञ,कोपरगाव न्यायालय.

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला.यानंतर झालेल्या झटापटीत आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले.या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळेच नेते जालन्यातील उपोषणस्थळी भेट देऊन, मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा किंवा सहानुभूती दर्शवत आहेत.मात्र,मराठा आरक्षणाचा किंवा कुठल्याही आरक्षणाचा मुद्दा हा विधिमंडळाच्या अख्त्यारितला प्रश्न नसून,न्यायालयीन कक्षेतला मुद्दा आहे आणि त्यासाठी मराठा आरक्षण समर्थकांनी न्यायालयीन लढाई सुद्धा लढलीय.मात्र,मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही.हे इथे महत्वाचे आहे.तरीही राज्यभरात विविध संघटना आणि त्याचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे.त्यासाठी समाजाचा पाठींबा लाभत आहे.त्यामुळे हा प्रश्नाचे नेमके काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर अड्.योगेश खालकर,मनसेचे अनिल गायकवाड व विनय भगत आदी कार्यकर्त्यांनी,’आमरण उपोषण’आंदोलन करून त्याची धार वाढवली असल्याचे मानले जात असून कोपरगाव तालुक्यातील राजकीय नेत्यांची पंचायत करून ठेवली आहे.या आंदोलनाला आज अखेर अनेक राजकीय नेते आणि विविध संघटना,ग्रामपंचायतींनी मोठा पाठींबा दर्शवला आहे.

दरम्यान या उपोषण कर्त्यांची माजी आ.अशोक काळे यांनी नुकतीच भेट घेतली.त्यांच्या तब्बेतीची आस्थेवाईकपणे चौकशी करून तब्बेतीची काळजी घ्यावी असा सल्ला दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

त्यात कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी,शहर शिवसेना (उबाठा गट),राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,प्रहार जनशक्ती पक्ष,रामराज्य सार्वजनिक हिंदू उत्सव व मराठा पंच पोहेगाव,जिजाऊ महिला मंडळ,मराठा समाज,प्रहार जनशक्ती कोपरगाव तालुका समस्त शिंपी समाज संघटना,मुस्लिम समाज पूरस्कृत लबैक सोशल फाउंडेशन कोपरगाव,आदींसह ग्रामपंचायत टाकळी,डाऊच खुर्द ग्रामपंचायत,हंडेवाडी ग्रामपंचायत,करंजी ग्रामपंचायत,येसगाव ग्रामपंचायत,रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत,रामवाडी भजनी मंडळ,आदींनी आपला पाठींबा दर्शवला आहे.त्यामुळे या आंदोलनाचे वजन वाढत चालले असल्याने त्याचे शेतकऱ्यांचे पुणतांबा आंदोलन व्हायला नको अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान या प्रसंगी बोलताना आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते अड्.योगेश खालकर यांनी म्हटले आहे की,”केंद्राने भारतीय राज्य घटनेची दुरुस्ती करून सूची ९ मध्ये आरक्षण टाकून तामिळनाडू राज्याप्रमाणे आरक्षण मर्यादा ६९ टक्क्यांपर्यंत वाढवावी व राज्यातील मराठा समाजाला दिली जाणारी सापत्नपणाची वागणूक तात्काळ थांबवावी असे आवाहन केंद्र व राज्य सरकारला करून,’मराठा आरक्षण’ जाहीर करण्याची जाहीर मागणी केली आहे.

आज आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळी असता त्या ठिकाणी अड्.योगेश खालकर,मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,विनय भगत,आदी प्रमुख आंदोलन कार्यकर्त्यांसह पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,सुनील देवकर,उबाठा सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे,काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कृष्णा आढाव,उबाठा सेनेचे तालुका उपाध्यक्ष रंगनाथ गव्हाणे,विजय जाधव,बाळासाहेब देवकर,गजाजन मते,संतोष वर्पे,उपसरपंच त्र्यंबक वर्पे,प्रकाश गोर्डे,महेश खालकर,सुनील वर्पे,अनिल वर्पे आदींसह अनेकांनी हजेरी लावली आहे.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार मराठा नेते संभाजी दहातोंडे आदींनी भेट दिली असून आपला पाठींबा दर्शवला असल्याची माहिती हाती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close