विशेष दिन
…या पंचायत समितीत ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाने दि.१ एप्रिल २०२५ रोजी ‘२८ एप्रिल’ हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी,’सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून आज या दिवशी कोपरगाव पंचायत समितीत गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून भ्रष्टाचार मुक्त काम करण्याची शपथ घेतली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५ या कायद्यानुसार,नागरिकांना त्यांच्या आवश्यक सेवा वेळेत मिळतील याची खात्री केली जाते.या अंतर्गत नागरिकांना आपल्या सेवा देण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि स्पष्ट असावी,सेवा वेळेत मिळाव्यात,यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा निश्चित करून भ्रष्टाचारमुक्त सेवा प्रदान केली जाते”- संदीप दळवी,गटविकास अधिकारी,पंचायत समिती कोपरगाव.
महाराष्ट्र शासनाने दि.१ एप्रिल २०२५ रोजी ‘२८ एप्रिल’ हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी,’सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.१० वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक २८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने विशेष करुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील जनतेला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५’ अंमलात आणला आहे.या अधिनियमातील कलम ४ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले आहे.हा कायदा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून भ्रष्टाचार मुक्त जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरीत करत आहे.या कायद्याने नव्याने निर्मित केलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाने आपले ब्रीदवाक्य “आपली सेवा आमचे कर्तव्य ” असे निर्धारित केलेले आहे.शासनाने आयोगाच्या शिफारशी नुसार आयोगाने निर्धारीत केलेले बोधचिन्ह व ब्रीदवाक्य हे नागरीकांना दिल्या जाणाऱ्या सर्व अधिसूचित सेवांच्या प्रमाणपत्रांवर मुद्रित केले जात आहे. हे बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य शासकीय विभागांकडून त्यांच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सेवाभाव हेच कर्तव्य ही कर्मयोगाची भावना उर्धृत तर करतेच शिवाय ती त्यांनी अवलंबलेली पारदर्शकता, संवेदनशिलता व कार्यक्षम समयोचितता अशा सर्वेात्तम गुणवत्तेची ग्वाही सुध्दा देत आहे.त्यामुळे नागरिकांना सेवा मिळण्यात मोठे सहाय्य होत आहे.त्यामुळे सरकारी दरबारी कामे वेगाने होत आहे.आजचा हाच दिवस सरकारने सेवा हक्क दिन ‘ म्हणून जाहीर केला आहे.त्यानिमित्त आज कोपरगाव येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडून या सेवेबाबत आज शपथ घेतली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यामुळे नागरिकांना आपल्या सेवा मिळण्यात मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

सेवा हक्क कायदा म्हणजे नागरिकांना सरकारी आणि सार्वजनिक विभागात पारदर्शक,जलद आणि कालबद्ध पद्धतीने सेवा मिळण्याचा अधिकार आहे,असा कायदा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५ या कायद्यानुसार,नागरिकांना त्यांच्या आवश्यक सेवा वेळेत मिळतील याची खात्री केली जाते.या अंतर्गत नागरिकांना आपल्या सेवा देण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि स्पष्ट असावी,सेवा वेळेत मिळाव्यात,यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा निश्चित केली जाते,नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती असायला हवी,जर सेवा वेळेत न मिळाल्यास,नागरिकांना अपील करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.