पणन
…या ठिकाणी होणार उपबाजार सुरू !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उद्या संपन्न होणाऱ्या गुडी पाडव्याच्या दिवशी रविवारी ३० मार्च रोजी दुपारी ०४ वाजता मोर्विस (धामोरी फाटा) या ठिकाणी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते उपबाजाराचे भूमिपूजन संपन्न होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे हे राहणार असल्याचे समजत आहे.

कोपरगाव येथील बाजार समिती ही केवळ भ्रष्टाचारासाठी ओळखली जाऊ लगली आहे.कोपरगाव तालुक्यातील अनेक अशी गावे आहेत पण त्या ठिकाणी उपबाजार सुरू करण्यास राजकीय नेत्यांना वेळ नाही.आपत्या इशाऱ्यावर नाचणारे पदाधिकारी नेमून त्यांचेकडून केवळ राजकीय नेत्यांना सोयीची असलेली होयबाची कामे केली जात आहे.
कोपरगाव तालुक्याची बाजार पेठ ओसाड पडली आहे.शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी सह्याद्री घाट माथ्यावर धरणे बांधून पर्जन्य छायेच्या प्रदेशातील भूकबळी थांबविण्यासाठी व शेती सिंचनासाठी पाणी निर्माण केले आज ते पाणी स्वातंत्र्यानंतर उद्योग आणि महानगरांना आणि आपल्या आप्तगतांना खिरापतीसारखे वाटून दिले आहे.त्यामुळे आता शेतकरी परावलंबी झाला आहे.त्याला कारखान्याचे मालक बनवताना इंग्रजांच्या नितीसारखे चक्क गुलाम बनवून टाकले आहे.तालुक्यात प्रगत बाजार समिती असताना तिचे राहाता तालुक्यात परवानगी देऊन दोन तुकडे पाडले गेले आहे.शिर्डी येथील श्री साई संस्थानच्या भुसार आणि शेतमालाची मालाची खरेदी बंद केली आहे.आज राहाता बाजार समितीच्या अवघ्या वीस वर्षात प्रगत गणली जाऊ लागली आहे.मात्र याचे कोणालाही काही सोयरसुतक वाटताना दिसत नाही हे विशेष !
कोपरगाव येथील बाजार समिती ही केवळ भ्रष्टाचारासाठी ओळखली जाऊ लगली आहे.कोपरगाव तालुक्यातील अनेक अशी गावे आहेत पण त्या ठिकाणी उपबाजार सुरू करण्यास राजकीय नेत्यांना वेळ नाही.आपले इशाऱ्यावर नाचणारे पदाधिकारी नेमून त्यांचेकडून केवळ राजकीय नेत्यांना सोयीची असलेली होयबाची कामे केली जात आहे.या आधी गत पंचवीस वर्षांपासून जवळके ग्रामपंचायतीचे उपबजाराची मागणी करूनही व दुष्काळी भाग असूनही त्यांची मागणी डावलली जात आहे.जवळके हे ठिकाण राहाता-वावी आणि संगमनेर-कोपरगाव तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने व त्याच मार्गावरून मुंबई,ठाणे,नाशिक,गुजरात आदी ठिकाणाहून येणारा साई पालखी मार्ग आहे.सदर ठिकाणी उपबाजार सुरू झाल्यास बाजार समितीचे मोठे उत्पन्न (महुसल) वाढू शकते मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
सदर दुष्काळी गावात उपबाजार सुरू झाल्यास त्या दुष्काळी तेरा गावात आता निळवंडे कालवा कृती समितीने निळवंडे धरणाचा लढा न्यायालयात लढून दारू कारखान्यांच्या मुखातून काढून पाणी शेतकऱ्यांच्या शेतात (दारात) आणले आहे.त्या भागात जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेने शेतकऱ्यांत जागृती करून त्या दुष्काळी भागात विमानतळ आणून रस्ते मार्ग विकसित करून त्या दुष्काळी भागाची विकासाची कवाडे खुली केली आहे.परिणामी त्या भागात शेती उत्पन्न वाढून त्याचा अप्रत्यक्ष फायदा बाजार समितीस मिळणार असताना त्याकडे दुर्लक्ष करून काही मंडळी आपले घोडे दामटत आहे.त्याचा फटका त्यांना आगामी काळात बसू शकतो असे बोलले जात आहे.त्यामुळे सदर भागात खाजगी बाजार खरेदी केंद्रे वाढण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान उद्या संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,नितीन औताडे,जिल्हा सहकारी निबंधक गणेश पुरी,बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,उपसभापती गोवर्धन परजणे,बाजार समितीचे सर्व संचालक,कोपरगाव येथील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.