जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

…या बंधाऱ्याचे काम वेळेत पूर्ण करा-..या आमदारांच्या सूचना

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   वारंवार नादुरुस्त होणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील मंजूर येथील बंधारा दुरुस्ती साठी ४१ कोटी रुपये मंजूर केले असून सदरचे काम वेळेत पूर्ण करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे  यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहेत.त्याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

”मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा खर्च जरी मोठा होता याची जाणीव ठेऊन आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करायचा या उद्देशातून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता त्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार्य केले असून त्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महायुती शासनाकडून ४१ कोटी रुपये मंजूर करून आणले आहे”-आ.आशुतोष काळे.

  आ.काळे यांनी बुधवार दि.०७ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मंजूर बंधाऱ्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या समवेत मंजूर बंधाऱ्याच्या सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली.यावेळी सुरु असलेल्या कामाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला यावेळी या सूचना दिल्या आहेत.

  सदर प्रसंगी यावेळी कार्यकारी अभियंता ग.प्र.हारदे,सहाय्यक अभियंता स.ना.देशमुख,कॉन्ट्रॅक्टर श्री.यादव आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व मंजूर,चास नळी,हंडेवाडी,धामोरी,मायगाव देवी,कारवाडी,वेळापूर,बक्तरपूर आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर,चास नळी,हंडेवाडी,धामोरी,मायगाव देवी,कारवाडी,वेळापूर,बक्तरपूर आदी गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला मंजूर बंधारा तीन वेळेस वाहून गेल्यामुळे मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले होते.त्यामुळे मागील काही वर्षापासून बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती.शेतकऱ्यांना पडलेल्या चिंता पाहून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बंधाऱ्याची दुरुस्तीसाठी निधी देण्याचा आपण दिलेला शब्द पूर्ण केला आहे.अशा मोठ्या कामांसाठी पुन्हा पुन्हा शासनाकडून निधी मिळेल याची शाश्वती नाही.मंजूर बंधारा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून माझ्याप्रमाणे शेतकऱ्यांचे देखील सुरु असलेल्या कामावर लक्ष आहे.त्यासाठी सुरु असलेले काम वेळेत तर झालेच पाहिजे त्याचबरोबर हे काम उच्च दर्जाचे देखील होणे तेवढेच गरजेचे आहे.परिणामी कायमस्वरूपी या बंधाऱ्यात पाणी साठविले जाईल व कितीही मोठा पूर आला तरी मंजूर बंधारा अभेद्य राहील याची काम करतांना काळजी घ्या अशा सूचना आ.काळे यांनी यावेळी दिल्या आहेत.

   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close