कोपरगाव शहर वृत्त
…या शहरातील समस्यांसाठी आता जनता दरबार ?

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात समस्यांचा महापूर आल्यानंतर जाग आलेल्या आ.आशुतोष काळे यांनी उशिराने का होईना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी हात घातला असून त्यासाठी आगामी सोमवार दि.०५ मे रोजी दुपारी ०३ वाजता कोपरगाव शहरातील नागरिकांच्या कोपरगाव नगरपालिकेच्या संदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोपरगाव शहरात डासांचे साम्राज्य तयार झाले आहे.नागरिकांना ०८ दिवसांनी पिण्याचे अशुद्ध पाणी मिळत आहे.उद्घाटन होऊन दीड वर्षे उलटूनही अद्याप पाच क्रमांकाच्या तलावाचे शुद्ध पाणी जनतेला मिळालेले नाही.प्रशासनावर कोणाचा ही वचक राहिलेला नाही.रस्ते धुळीने माखलेले आहे.शहरात मोकाट जनावरांचा पूर आला असल्याच्या पार्श्वभूमीवर हा ‘जनता दरबार’ होत आहे.
कोपरगाव शहरात आणि तालुक्यात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे.गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.टंचाई संपत आल्यावर बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे.जलजीवन मिशन योजनांचा बोजवारा उडाला आहे.अशातच उशिराने का होईना आ.काळे यांनी आपल्या जनता दरबाराच्या विभागनिहाय बैठका सुरू केल्याने अधिकाऱ्यांवर वचक निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
कोपरगाव शहरात डासांचे साम्राज्य तयार झाले आहे.नागरिकांना ०८ दिवसांनी पिण्याचे अशुद्ध पाणी मिळत आहे.उद्घाटन होऊन दीड वर्षे उलटूनही अद्याप पाच क्रमांकाच्या तलावाचे शुद्ध पाणी जनतेला मिळालेले नाही.प्रशासनावर कोणाचा ही वचक राहिलेला नाही.रस्ते धुळीने माखलेले आहे.शहरात मोकाट जनावरांचा पूर आला आहे.एका पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १९ नागरिकांना चावा घेतला आहे.त्यांना देण्यास प्रतिबंधक लस कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हती त्यांना नगर येथे रवाना करावे लागले होते.शहरात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही.विधानसभा निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधीस मोठे मताधिक्य मिळाल्याने नागरिकांचे दूरध्वनी उचलले जात नाही.इतका कारभार सुसाट सुरू आहे.अशा पार्श्वभूमीवर हि बैठक सोमवार दि.०५ मे रोजी दुपारी ०३ वाजता कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दरम्यान या जनता दरबारात नगरपालिका क्षेत्रातील कोपरगाव शहरातील नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेच्या संदर्भातील आपल्या समस्या व अडचणी लेखी स्वरूपता मांडाव्यात असे आवाहन आ.काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.त्याला नागरिक कसा प्रतिसाद देणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.