कोपरगाव शहर वृत्त
शहरातील शांतता समितीच्या बैठकांना मुहूर्त कधी ?-…या नेत्याचा सवाल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कायमस्वरूपी शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी नियमितपणे शांतता समितीच्या बैठका होणे अत्यंत गरजेचे असूनही त्याकडे राजकीय लोकप्रतिनिधींचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याची टीका करून त्या नियमित घ्याव्या अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.

कोपरगाव शहरातील ‘सचिन वॉच कंपनी’त मध्यवस्तीत भल्या पहाटे मोठी चोरी होऊन यात रोकड ०५ लाख रुपये तर ३५ लाख रुपयांची किंमती टायटन व टाइमेक्स घड्याळे आदीसंह जवळपास ५० लाख रुपयांचा माल लंपास करून चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिले आहे.तर दिनाक ०५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास काकडी ग्रामपंचायत हद्दीत चोरीच्या नादात चोरट्यांनी एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी घेतला आहे.त्यांना अद्याप एक फुटक्या कवडीची भरपाई सरकारने जाहीर केली नाही.शिवाय पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी सपशेल पाठ फिरवली आहे.
कोपरगाव शहरात पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या,’सचिन वॉच कंपनी’त राज रस्त्यावर भल्या पहाटे मोठी चोरी होऊन यात रोकड ०५ लाख रुपये तर ३५ लाख रुपयांची किंमती टायटन व टाइमेक्स घड्याळे आदीसंह जवळपास ५० लाख रुपयांचा माल लंपास करून चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिले आहे.तर दिनाक ०५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास काकडी ग्रामपंचायत हद्दीत चोरीच्या नादात चोरट्यांनी एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी घेतला आहे.त्यांना अद्याप एक फुटक्या कवडीची भरपाई सरकारने जाहीर केली नाही.शहरात कायदा सुव्यवस्था उडाणटप्पूनी धाब्यावर बसवली आहे.स्वामी समर्थ मंदिरासमोर विधानसभा निवडणूक पूर्व गोळीबार झाला होता.सुभाषनगर येथे वाढणारी गुन्हेगारी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी झालेल्या हाणामाऱ्या या कायदा सुव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या ठरल्या आहेत.शहरात आणि तालुक्यात वाळू चोरी,नियमित होणारा रेशन घोटाळा,प्रशासनात होणारा भ्रष्टाचार त्यात अडकेलेले अधिकारी आणि कर्मचारी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे.या शिवाय दुचाकी आणि चार चाकी चोऱ्या या नित्याच्या बाबी ठरल्या आहेत.याबाबत कोणीही प्रशासनाला जाब विचारत नाही.परिणामी शहरात महिला आणि नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

शहरात नुकत्याच पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १९ जणांना चावा घेतला होता.तर त्यांना देण्यासाठी ग्रामीण आरोग्य केंद्रात इंजेक्शन उपलब्ध नव्हते त्यामुळे जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याची भावना निर्माण झाली असेल तर याला जबाबदार कोणाला धरणार असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
मोकाट प्राणी ही वेगळी समस्या ठरली आहे.शहरात नुकत्याच पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १९ जणांना चावा घेतला होता.तर त्यांना देण्यासाठी ग्रामीण आरोग्य केंद्रात इंजेक्शन उपलब्ध नव्हते त्यामुळे जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याची भावना निर्माण झाली असेल तर याला जबाबदार कोणाला धरणार असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.टंचाई बैठक ही फेब्रुवारी म्हणजेच टंचाई सुरू होण्याचे आधी होणे गरजेचे असताना टी टंचाई केवळ दीड महिना शिल्लक असताना संपन्न झाली आहे.अशा एक ना अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.त्यामुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत होण्यासाठी शहरात आणि तालुक्याच्या शांतता समितीच्या बैठका वेळेत होणे गरजेचे असताना त्याकडे कोणाचे ही लक्ष नाही.त्यामुळे विजय वडाहणे यांनी नेमक्या वेळेला लक्ष वेधले आहे.

त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हंटले आहे की,’जयंती,पुण्यतिथी,धार्मिक कार्यक्रम यासाठी वेळोवेळी शहरातील सर्वपक्षीय-सर्वधार्मिय नेते-कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांचेसह मीटिंग न घेता वेळोवेळी काही जातीच्या किंवा धर्माचे ठराविक नेते व कार्यकर्त्यांना बोलावून बैठकीचा उपचार पार पाडला जातो.सर्वांनाच एकत्रित बोलावून सर्वसमावेशक समिती बैठक होत नसल्याने एकमेकांबद्दलचे गैरसमज-म्हणणे-वाद मांडलेच जात नाहीत.त्यामुळे अनेक विषयावर असलेले वाद-संघर्ष आतल्या आत घुमसत रहातात व एखाद्या दिवशी,एखाद्या सार्वजनिक कार्यक्रम-उत्सवात त्या असंतोषचा स्फ़ोट होतो हे कोपरगावकरांनी अनेकदा अनुभवले आहे.काही उपटसुंभ तर कुणाशीही विचारविनिमय-चर्चा न करता कोपरगाव बंदही पुकारतात.हातावर पोट भरणाऱ्यांचे हाल होतात.सर्वात जास्त नुकसान लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे-दुकानदारांचेच होते.त्यामुळेच शहरात अनेक अपप्रवृत्ती बळावतात व शहरात गुन्हेगारी वाढून शांतता सुव्यवस्था धोक्यात येते.याच वातावरणाचा फायदा घेऊन अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून हप्तेबाजी करणारेही समाजसेवक म्हणून मिरवितात हेही कटूसत्य आहे.त्यामुळे पोलीस प्रशासन,तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन शांतता समितीच्या बैठका वरचेवर घेतल्या पाहिजेत.शहरातील स्वच्छ प्रतिमेचे समाजसेवक,कार्यकर्ते,व्यापारी प्रतिनिधी,राजकीय नेते-कार्यकर्ते,संघटना यांना बोलावून विचारविनिमय केला पाहिजे.अन्यथा आधीच शिगेला पोहचलेली गुन्हेगारी-समाजकंटकांची मुजोरी वाढतच जाणार आहे.पोलीस प्रशासनाचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे.तडीपार-अवैध धंदे करणारे यांची पोलीस ठाण्यात होणारी उठबस सर्वसामान्य नागरिकांसाठी,शहरासाठी घातक आहे.राजकीय हस्तक्षेपाला अधिकाऱ्यांनी बळी पडू नये.दंडूक्याचा वापर करा हे आपण अधिकाऱ्यांना नेहमीच सांगत असतो;पण ते कोणत्या दबावाखाली आहेत हेही कळत नाही.आता तर भर वस्तीत दरोडे पडू लागलेत.आता तरी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी शेवटी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.