आंदोलन
राज्य सरकारच्या…जागेत बाजार समितीचे विस्तारीकरण करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगांव शहरालगत असलेल्या खंडोबा मंदिराजवळ राज्य शासनाच्या नावे असलेली जागेत गट नं.१९३५(अ) या ५० एकर ३३ गुंठे प्रशस्त जागेत शेतकरी,व्यापारी आणि ग्राहक यांना मध्यवर्ती असलेल्या बाजार समितीचा नव्याने विस्तार करावा अशी महत्वपूर्ण मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे नुकतीच एका पत्राद्वारे मागणी केली आहे.त्याचे तालुक्यातून शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
“वर्तमान काळात या शासकीय जमीनीवर उपलब्ध असलेल्या ईमारतीत शासकीय कार्यालय अथवा मार्केट कमेटीचे सुसज्ज कार्यालय ताबडतोब उपलब्ध होवू शकते.तसेच सदर जागा ही राष्ट्रीय महामार्ग लगत आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दळणवळण आणि शहराच्या बाजारपेठेच्या व वहातुकीच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे”-नितीन शिंदे,सरचिटणीस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.
कोपरगाव बाजार समितीने अलीकडील काळात खुला कांदा,डाळींब मार्केट सुरु केल्याने सिन्नर,वैजापूर,निफाड,येवला राहाता आदी नजीकच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक वाढली आहे.परिणामी त्यामुळे वर्तमान बाजार समितीची जागा पुरेशी ठरेनासी झाली आहे.मागील आठवड्यात एका दिवशी जवळपास १७ हजार रुपयाहुन अधिक कांदा मालाची अवाक झाली होती.त्यामुळे हा लिलाव बैल बाजारात करावा लागला होता.त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अनेक व्यापाऱ्यांना आपला खरेदी केलेला शेतमाल साठवणुकीसाठी जागा पूरेसी ठरत नाही हे वास्तव आहे.त्यामुळे बाजार समिती जागेच्या शोधात असल्याची माहिती आहे.बऱ्याच वेळा काही राजकीय नेत्यांनी आपल्या व आपल्या समर्थकांच्या जागा बाजार समितीच्या गळ्यात भाड्याने देण्याचे षडयंत्र आखून त्यात आपले हात ओले करण्याचे प्रकार उघड झाले होते.त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अशातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे यांनी हि मागणी केली असल्याचे याचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.
त्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की,”गट क्रं.१९३५(अ) हि जागा ही राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी लगत आहे.सदर जागा बाजार समितीच्या विस्तारीकरणास योग्य असल्याची शेतकरी आणि आम्हा सर्वांना योग्य वाटत आहे.तेथे कोपरगाव बाजार समिती स्थलांतरित आणि विस्तारित केल्यास सदर जागा महामार्गालगत असल्याने सर्वांनाच सोईस्कर होवू शकते.सदर जागा महाराष्ट्र शासनाचे मालकीची आहे.मात्र सदर जागेत महात्मा गांधीं जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टने शेतकी प्रदर्शनाच्या नावाखाली बांधकाम केलेले आहे.तेथे गाळे उभारणी करुन भव्य मंगल कार्यालय भव्य वाहनतळासह उभारणी केलेली आहे.नुकतेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार ही जागा ईतर कोणाचीही नसून ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याचे उघड झाले आहे.मात्र त्याचे उत्पन्न आजही बेकायदेशीर पणे ठराविक लाभार्थी बेकायदेशीर पणे घेत असल्याचा आरोप केला आहे.
हि बाब उच्च न्यायालयाचे निदर्शनास आले नंतर सदर ठिकाणी महाराष्ट्र शासन मालकी हक्काचा ७/१२ उतारा आहे. येथील मंगल कार्यालयाचे दोन्ही मोठे हाॅल मध्ये शेतकऱ्यांना धान्य साठवणुकीसाठी वेअर हाऊस म्हणून उपयोग होवू शकतो.सदर ठिकाणी व्यापारी यांचेसाठी अधिक गाळे उपलब्ध होवून शकतात हि बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.
वर्तमान काळात या शासकीय जमीनीवर उपलब्ध असलेल्या ईमारतीत शासकीय कार्यालय अथवा मार्केट कमेटीचे सुसज्ज कार्यालय ताबडतोब उपलब्ध होवू शकते.तसेच सदर जागा ही राष्ट्रीय महामार्ग लगत आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दळणवळण आणि शहराच्या बाजारपेठेच्या व वहातुकीच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे.त्यामुळे शेतकरी,व्यापारी आणि ग्राहक सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून सरकारला धन्यवाद देतील.कोपरगांव शहरात ग्रामीण जनतेचे दळणवळण वाढून बाजारपेठ वाढीस मोठी मदत होईल.असे सांगत तालुक्यातील शेतकऱ्यासाठी हितकारक निर्णय घ्यावा अशी विनंती नितीन शिंदे यांनी शेवटी केली आहे.
सदर निवेदनाची प्रत विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार,शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी आदींना पाठवली आहे.