जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

मोकाट प्राण्यांचा उपद्रव वाढला,६ लहान मुलांसह १९ जखमी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने गजानननगर परिसरात हैदोस घातला असून सहा लहान मुलांसह जवळपास १९ जणांना चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी माजी नगरसेवक विद्या सोनवणे यांनी लक्षवेध करून पालिकेला जागे केले मात्र त्याचा उपयोग झाला नाही.मात्र कहर तर तेव्हा झाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी इंजेक्शन नव्हते त्यामुळे संजीवनी सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी त्यांची रवानगी नगर येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये करावी लागली आहे.

  

कोपरगाव शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने गजानननगर परिसरात हैदोस घातला असून जखमींना नगर येथे हलवताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,रवींद्र पाठक,माजी नगरसेवक विद्या सोनवणे आदी मान्यवर दिसत आहे.

   कोपरगाव शहरात गायी,कुत्रे,गाढवे आदी मोकाट प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे वारंवार अपघात होताना दिसत आहे.त्याचे आर्थिक आणि जीवित मूल्य नागरिकांना चुकवावे लागत आहे.अशीच घटना आज सकाळी गोरोबा नगर आणि गजानन नगर आदी परिसरात उघडकीस आली आहे.पहिल्यांदा याचा फ्टका माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांना बसला आहे.ते सकाळी फिरून आल्यावर आपल्या गेट मधून घरात जात असताना एका कुत्र्याने त्यांना चावा घेतला होता.त्यातून त्याने तेथून पळ काढला व पुढे जवळपास १९ नागरिकांना चावा घेतला आहे.त्यात ०६ लहान मुलाचा समावेश आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.मात्र घटनास्थळी कोपग्रव नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण यांनी तातडीने धाव घेतली होती.

  

‘रेबीज’ हा पशुजन्य संक्रमित आजार आहे.हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही कुत्रा चावल्यामुळे होतो.रोगाची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे.मात्र कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध नसल्याने माजी नगरसेवक विद्या सोनवणे यांचेसह नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  या घटनेची खबर माजी नगरसेवक विद्या सोनवणे यांनी कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिली होती.मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही असा त्यांनी आरोप केला आहे.त्यामुळे जखमींत वाढ झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान याबाबत सदर नागरिकांनी या कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज हा प्राणघातक रोग होऊ नये यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती.मात्र त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यावर देण्यासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगितले होते.बाहेर खाजगी रुग्णालयात त्याची विक्रमी किंमत ०८ हजार रुपये असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना हा आर्थिक भार सोसणे शक्य नसताना या घटनेची खबर माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,रवींद्र पाठक,विनोद राक्षे आदींनी संजीवनी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांना समजली होती.त्यांनी तातडीने पावले उचलून सदर रुग्णांना नगर येथे हलविण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान सदर कुत्रा काही वेळाने मृत अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

   दरम्यान यात जखमीत माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे (वय -५९)सह गंगाधर नरहरी देसाई,(वय-८५)राजश्री राजेंद्र दळवी,(वय -१६)स्वाती संतोष बागल,वय -११)साईराज शंकर येलमामे,(वय -०५)सतीश इनामदार,(वय – ७१)शिवकन्या भारत काकड,(वय -०४) प्रांजल दिलीप भालेराव,(वय -११),सोनाली सतीष म्हस्के,(वय – ३५)सिमरन शाहरुख हासन,(वय – ३३) ग्रासी अमोल ठोकळ,(वय -१०)अनिल सुधाकर घोडेराव,(वय – ३५),देवश्री लक्ष्मण तपुसुंदर,(वय – ०२),जय मोसम कसबे,(वय -११),रंजना डाके,(वय – ५५),लक्ष्मण शिंदे,लखन घोडेराव,शंकर हेमाने,दिपक बोळवतकर आदींचा समावेश आहे.

  दरम्यान  रेबीज हा अतिशय तीव्र स्वरूपाचा विषाणूजन्य प्राणघातक रोग आहे.रेबीज हा पशुजन्य संक्रमित आजार आहे.हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही कुत्रा चावल्यामुळे होतो.रोगाची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे.मात्र कोपरगाव शहरात ही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.व ही लस मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

  दरम्यान आमच्या प्रतिनिधीने मुख्याधिकारी सुहास जगताप यांचेशी संपर्क केला असता आमचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण हे घटनास्थळी तातडीने गेले होते व त्यानंतर आपणही काही वेळाने गेलो होतो असे सांगून आरोपाचे खंडन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close