जयंती,पुण्यतिथी अभिवादन
विद्यार्थिनींनी सामाजिक संकेतस्थळाच्या आहारी जाणे धोकादायक-इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान पिढीला भ्रमणध्वनी माध्यमांचे आकर्षण आहे,मात्र याबाबत मुलींनी या व्यसनाच्या आहारी जाणे धोकादायक असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील महिला वकील श्रद्धा जवाद यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले या ओळखल्या जातात.त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता.त्यांना त्यांच्या जयंती निमित्त कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक के.जे.सोमय्या महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित केला होता.
सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय समाजसुधारक,शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्या ओळखल्या जातात.त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता.त्यांना त्यांच्या जयंती निमित्त कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक के.जे.सोमय्या महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित केला होता.टीव्ही वेळी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करत होत्या.सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हे होते.
सदर प्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव म्हणाले की,”विद्यार्थिनींनी शिकले पाहिजे,शिकता शिकता संशोधन आणि लेखन केले पाहिजे,त्याचबरोबर विद्यार्थिनींनी आपल्या हक्क आणि अधिकाराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आलेल्या विद्वान वक्त्या ऍडव्होकेट श्रद्धा जवाद यांच्या व्याख्यानातून बोध घेऊन स्रियांविषयी असलेल्या कायद्यांची माहिती करून घेतली पाहिजे व आपल्या भविष्याबद्दल जागरूक राहिले पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख प्रा.नीता शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महिला सबलीकरण कक्षाच्या सदस्य डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी केलेआहे.