जाहिरात-9423439946
गृह विभाग

शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी मोठा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)

शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌.त्यातून कॉर्गा टर्मिनल,नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील.यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल.यावर्षी शिर्डी,नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

“राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे.राज्यातील पोलीसांना पुढील दोन महिन्यांत ६ हजार ८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील.शासनाने एस.आर.पी.एफ.मधील पोलीसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे”-ना.दिलीप वळसे पाटील,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य.

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

शिर्डी येथील वसाहत इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित,मुंबई यांनी केले आहे.यावेळी श्री.अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलिस व १ पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या आहे.

सदर प्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,खा.सदाशिव लोखंडे,खा.सुजय विखे,आ. किशोर दराडे,पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप-महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील,जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”देश अमृत महोत्सव साजरा करत आहे.या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल.तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिली आहेत.या निधीत जूलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल.असा शब्द आपण आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देतो.पोलीसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत.या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.

“पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे,संपर्क यंत्रणा,सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे.याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसा़नी करू नये”-ना.अजित पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे,संपर्क यंत्रणा,सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे.याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसा़नी करू नये.असे आवाहन शेवटी उपमुख्यमंत्री श्री.पवार या़नी केले आहे.गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनी ही एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे.गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते.जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.

सदर प्रसंगी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की,”कोरोना काळात पोलीसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले.गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌.राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही.यासाठी काम करावे लागेल असेही शेवटी गृहमंत्री वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

सदर कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे,उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील,हिरालाल पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close