जाहिरात-9423439946
आरोग्य

रुग्ण रुग्णसंख्या वाढली,कोपरगावात..हे उपनगर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांवर योग्य उपचार होवून त्यांची गैरसोय होवू नये यासाठी बुधवार दि.१७ मार्च पासून श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात १०० बेडचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान कोपरगाव शहरातील सुभद्रा नगर परिसरात मोट्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने हा परिसर तालुका प्रशासनने दि.२५ मार्च पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

कोपरगावात गत वर्षी लक्ष्मीनगर परिसरात दि.१० एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला महिला रुग्ण आढळल्यावर तालुका प्रशासनाने कोपरगाव शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते.त्या नंतर हि नामुष्की पुन्हा अकरा महिन्यानंतर उदभवली आहे.त्या मुळे सुभद्रा नगर परिसरातील अत्यावश्यक सेवा त्यात मेडिकल,किराणा,दवाखाना,दूध,भाजीपाला,गॅस,बँक,कृषी औषधे,व बियाणे आदी वगळता बाकी व्यवहार दि.१७ मार्च पासून ते दि.२५ मार्च पर्यंत सकाळी अकरा वाजेपासून ते रात्री १२ वाजे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी कोपरगाव येथील श्री गंगागिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात मागील वर्षी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. या कोविड केअर सेंटरमध्ये हजारो बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करून हे रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे प्रशासनाकडून हे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते.मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे कोपरगाव तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.त्यामुळे काही दिवसांपूर्वी लायन्स मूक बधीर विद्यालयात कोविड केअर सेंटर सुरु करून ग्रामीण रुग्णालयात देखील बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. मात्र बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेवून श्री गंगागिरीजी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यात रुग्णांच्या कमी झालेल्या संख्येवरून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काही अंशी यश मिळाले होते.मात्र काही दिवसांपासून मागील वर्षीप्रमाणेच पुन्हा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता कोरोना संकट किती दिवस राहील हे सांगता येणे शक्य नाही.त्यासाठी भविष्यात जर रुग्ण संख्या वाढली तर ज्या शाळा महाविद्यालयांकडे वसतीगृह उपलब्ध आहेत त्या शालेय संस्थांनी वसतीगृह उपलब्ध करून देवून कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.सर्व प्रकारचे आवाहन पेलण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत.तरी देखील भविष्यात कोरोणाचा उद्रेक टाळणे हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात असून वाढती कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शेवटी केले आहे.

कोपरगावात गत वर्षी लक्ष्मीनगर परिसरात दि.१० एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला महिला रुग्ण आढळल्यावर तालुका प्रशासनाने कोपरगाव शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते.त्या नंतर हि नामुष्की पुन्हा अकरा महिन्यानंतर उदभवली आहे.त्या मुळे सुभद्रा नगर परिसरातील अत्यावश्यक सेवा त्यात मेडिकल,किराणा,दवाखाना,दूध,भाजीपाला,गॅस,बँक,कृषी औषधे,व बियाणे आदी वगळता बाकी व्यवहार दि.१७ मार्च पासून ते दि.२५ मार्च पर्यंत सकाळी अकरा वाजेपासून ते रात्री १२ वाजे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.त्यामुळे या प्रतिबंधित क्षेत्रातून वाहनांची ये-जा बंद राहणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.त्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र अधिकारी म्हणून कोपरगाव पालिकेचे मुख्यधिकारी प्रशांत सरोदे यांना जाहीर केले आहे.त्या मुळे याभागातील सर्व व्यवहार आता शहर पोलीस बंद करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close